🕒 1 min read
नवी दिल्ली: आज मोदीजींच्या रूपाने भारताकडे असे नेतृत्व आहे ज्यावर प्रत्येक वर्गाला विश्वास आणि अभिमान आहे.आपल्या अथक परिश्रमाने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हा या विश्वासाचा भक्कम आधारस्तंभ आहे. आज 130 कोटी भारतीयांच्या विश्वासाची ही शक्ती देशाला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेत आहे. अशी स्तुतीसुमने भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे. भाजप सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
“गेल्या 8 वर्षांत नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नांमध्ये आणि आकांक्षांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. मोदीजींनी आपल्या सक्षम नेतृत्वाने आणि प्रबळ इच्छाशक्तीने देशाला सुरक्षित तर केलेच, पण असे अनेक निर्णय घेतले, ज्यांनी प्रत्येक देशवासीयाचे डोके अभिमानाने उंच केले.”, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.
मोदी जी के रूप में आज भारत के पास एक ऐसा नेतृत्व है जिसपर हर वर्ग को विश्वास भी है और गौरव भी।
अपने अथक परिश्रम से जनता की अपेक्षाओं को पूरा करना इस विश्वास का मजबूत स्तंभ है।
130 करोड़ भारतीयों के विश्वास की ये शक्ति आज देश को हर क्षेत्र में आगे ले जा रही है। #8YearsOfSeva
— Amit Shah (@AmitShah) May 30, 2022
पीएम नरेंद्र मोदी यांनी सत्ता हे सेवेचे माध्यम मानून गोरगरीब, शेतकरी, महिला आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळवून दिले, त्यामुळे त्यांचा लोकशाहीवर विश्वास निर्माण झाला आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्यांना सहभागी करून घेतले. अनेक ऐतिहासिक कामगिरीने भरलेल्या या 8 वर्षांसाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन. असे ट्वीट अमित शाह यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भाजपला ‘कोथळा’ शब्दाची ऍलर्जी पण सापळा, कोंडी हे त्यांचे आवडते शब्द”, संजय राऊतांचा टोला
- “भाजपने राज ठाकरेंच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली”, ‘शिवसेने’चा आरोप
- “…ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे”, संजय राऊतांचा भाजपला टोला
- “…प्रकरणात अजून फडणवीसांनी उडी कशी मारली नाही?”, संजय राऊतांचा टोला
- IPL 2022 GT vs RR Final : चहलचा पराक्रम! आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पिनरनं पटकावली पर्पल कॅप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
