Share

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ प्रस्तावास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दोन आठवड्यामध्ये सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला दिला होता. मात्र आता निवडणूक आयोगाने सादर केलेल्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका  पावसाळ्यानंतर घेण्यात येणार आहेत.

एकूण १४ महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया थांबवू नका, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान पावसाळय़ानंतर निवडणुका घेण्याची परवानगी आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर जेथे पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न करत निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे राज्य शासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!