🕒 1 min read
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकारचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.”खोटं बोल पण रेटून बोल”, ही शिवसेनेची नवी संस्कृती आहे. अशी टीका भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी ट्वीट करत केली आहे.
२०१७-१८ पासून जीएसटी लागू झाला तेव्हापासून २०२०-२१ पर्यंत कुठलाही परतावा केंद्राकडून राज्याला बाकी राहिला नाही. २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात १३ हजार ६२७ कोटी राज्याला द्यायचे आहेत. जीएसटी कौन्सिलप्रमाणे येत्या ऑगस्टपर्यंत ते पैसे सरकारला देण्यात येतील. परंतु महाराष्ट्राकडे कोळसा थकबाकी आणि रेल्वे यांची ११ हजार कोटींची थकबाकी राज्य सरकारची केंद्राकडे आहे. त्याबाबत मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का बसलेत? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.
#खोट_बोल_पण_रेटून_बोल
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकारचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘#खोटं_बोल_पण_रेटून_बोल’ ही शिवसेनेची नवी संस्कृती आहे. २०१७-१८ पासून #जीएसटी लागू झाला तेव्हापासून २०२०-२१ पर्यंत कुठलाही 1/3— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 2, 2022
तसेच मोदींच्या नावावर मतं मागितली, युतीत गद्दारी करत भ्रष्टवाद्यांशी हातमिळवणी केली. परंतु राज्य सरकारच्या कारभाराकडे कुणाचं लक्ष जावू नये म्हणून सातत्याने टोमणे बॉम्ब मारायचे आणि खोटं सांगायचं ही सोंग बंद करा. असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “4 तारखेनंतर अजिबात ऐकणार नाही”, भोंग्याबाबत राज ठाकरेंचा इशारा
- “भाडोत्री गर्दी ‘भ्याड’ वक्ता अन् सतरंजी उचलायला…”, शिवसेनेचा हल्लाबोल
- “एकही माणूस पवार साहेबांबद्दल खाजगी मध्ये चांगलं बोलताना…”, निलेश राणेंचा टोला
- “…विचित्राबाई जिथे भ्रष्टाचार तिथे तुम्ही”, चित्रा वाघ यांच्या टीकेवर शिवसेनेचे प्रत्युत्तर!
- “…त्यामुळे राज ठाकरे केवळ शरद पवारांवर बोलतात”, जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
