🕒 1 min read
बीड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत मोठे वक्तव्य करत त्यासमोर हनुमान चालीसा लावणार असे म्हटले होते. त्यानंतर उत्तर सभा घेत त्यांनी राज्य सरकारला भोंगे उतरविण्यासंदर्भात ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
धर्मा-धर्मामध्ये दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. कोणाविषयी बोलण्याचं कारण नाही, पण आपल्या समाजात अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधी ना कधी राजकीय नेत्यांना या विषयाला सामोरे जावं लागणार आहे. असे म्हणत प्रीतम मुंडे यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्या बीडमध्ये बोलत होत्या.
दरम्यान यावेळी त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही कौतुक केले आहे. कोरोना काळात सरकारने चांगले काम केले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे मात्र आरोग्य हा असा विषय आहे की, त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना केंद्र सरकार ज्याप्रकारे सजग आणि सतर्क होते त्याप्रमाणे राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले. असे प्रीतम मुंडे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- BANK खाते धारकांसाठी महत्वाची बातमी! आता कामे लवकर होणार!
- गणेश नाईकांवरील ‘त्या’ आरोपानंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- IPL 2022 : “ताई, तुला माझा अभिमान….”, बहिणीच्या निधनानंतर हर्षल पटेल झाला भावूक; शेअर केलं पत्र!
- IPL 2022: धक्कादायक! दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळाडू निघाला कोविड पॉझिटिव्ह, संपूर्ण संघ क्वारंटाईन
- “राज ठाकरेंना जाग आली असेल तर चांगलच आहे” ; किशोरी पेडणेकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
