🕒 1 min read
मुंबई: गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुंबई मेट्रोच्या 2-ए (Metro 2A) आणि मेट्रो ७ या मार्गिकेचे लोकार्पण आज (२ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धाटना अगोदरच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. त्यात या सोहळ्याला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणच देण्यात आले नाहीये. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका करण्याचा एक मौका सोडलेला नाहीये. आता भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
“जेव्हा जेव्हा मुंबई मेट्रो प्रकल्पाची चर्चा होईल तेव्हा या प्रकल्पाचे कर्ते करविते देवेंद्र फडणवीसजी यांचे नाव जरूर घेतले जाईल. फक्त मोडता घालणे एवढेच योगदान असून हि उदघाटन सोहळ्यात मिरवले अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही चर्चा होईल.”, असा टोला चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लगावला आहे.
दरम्यान “नागरिकांना माहिती आहे, आम्ही मेट्रोचे काम अतिशय गतीने केले. या सरकारच्या काळात ते रखडले. पण आनंद आहे की मेट्रो सुरू होते आहे. आम्हाला बोलाविले नाही तरी चालेल, पण सगळ्या मेट्रो सुरू करा. आरेत कारशेड उभारले तर मेट्रो-3 पण वेगाने सुरू होऊ शकते. ती पण सुरू करा.”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“सगळ्यांनीच मन मोठं करून जगायला शिकलं पाहिजे”- विजय वडेट्टीवार
IPL 2022: आंद्रे रसेलच्या पॉवर हिटिंगचा ‘किंग खान’ही झाला फॅन; ट्वीट करत म्हणाला….
“नागरिकांनी मास्क घालणं टाळू नये”- विजय वडेट्टीवार
IPL 2022 : जडेजाच्या CSKचं टेन्शन दूर होईना..! एक खेळाडू रुग्णालयात, तर दुसरा…
“शेतकऱ्यांचा आक्रोश तुमच्या बंद कानावर पडतो का पवार साहेब?”, सदाभाऊंचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
