🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी काही दिवसांपूर्वी “कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता है”, असे ट्वीट केले होते. त्यावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले होते. आता यावरच त्यांनी आज गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण दिले आहे.
“मी त्या दिवसापुरतं बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण मी जर बोललो नाही, तर अनेक विरोधकांची राजकीय दुकानं बंद होतील. विरोधक आमचे व्यक्तिगत शत्रू नाहीत मात्र ते वैचारिक शत्रू असू शकतात. त्यांच्याशी आम्ही त्या पद्धतीने लढू. सुडानं किंवा बदल्याच्या भावनेनं लढण्याचा प्रश्नच येत नाही.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी राज्यातील करोनाचे निर्बंध हटवणं, ही सरकारची मुख्यमंत्र्यांची जनतेला पाडवा भेट असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेची गुढी महाराष्ट्रावर सदैव फडकतच राहील. महाराष्ट्राच्या बाहेरही फडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपली गुढी इतरांपेक्षा उंच कशी राहील, यासाठी प्रयत्न करेन. असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: पंजाब विरुद्ध रसेलची बॅट तळपली; अन् एका शॉटवर अंपायर जखमी होता होता वाचला!
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार?
“जे आहेत मेट्रोचे मारेकरी ते बनले उद्घाटनकरी”, भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
मिस युनिव्हर्स हरनाज संधू ‘या’ आजाराशी देतेय झुंज; स्वतः केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
