🕒 1 min read
मुंबई: आजचा दिवस जगभरात ‘एप्रिल फूल डे’ म्हणून ओळखला जातो. एकमेकांची फसवणूक करून मजेत हा दिवस साजरा केला जातो. पण भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून एप्रिल फूल डे या दिवसाचे महत्व कमी झाल्याची टीका काँग्रेस नेते तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी केली आहे.
“मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून एप्रिल फूल दिवसाचे महत्त्व हरवले आहे. आता प्रत्येक दिवस एप्रिल फूल डे आहे.”, असे ट्वीट नितीन राऊत यांनी केले आहे. दरम्यान आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपवर निशाणा साधला आहे. सतत वाढणारी महागाई, इंधन दरवाढ, वाढती बेरोजगारी, अच्छे दिनच्या नावाखाली जनतेला आलेले बुरे दिन यामुळे भारतातील जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्त्वाखाली आज ‘एप्रिल फूल डे’ चे औचित्य साधून पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा केला गेला.
केंद्र सरकार ज्या ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच मुंबईमधील ईडी कार्यालयासमोर असलेल्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे अनोखे आंदोलन केले. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदींच्या फसव्या आश्वासनांचा केक कापण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: CSK vs LSG सामन्यात धोनीने रचला नवा इतिहास; रोहित – विराटलाही मागे सोडले
“पवार साहेब तुमचा हिंदूद्रोही चेहरा दिसू दे जगाला”, भातखळकरांचा टोला
अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
