Share

पालघर पोट निवडणुकीतील पराभव विसरू शकणार नाही – उद्धव ठाकरे

Published On: 

पालघर : भाजप आणि शिवसेना हे दोघेही सत्ताधारी पक्ष असले तरी देखील आतापर्यंत दोघेही कायमच परस्परविरोधी भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता नुकत्याच झालेल्या पालघर पोटनिवडणुकीमुळे त्यांचे संबंध आणखी ताणले गेल्याचं चित्र आहे. दरम्यान पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी पालघर निवडणुकीवरून भाजपवर निशाणा साधलाय. पालघर पोट निवडणूक साम दाम दंड भेद यांच्या विरुध्द अशीच झाली. त्यामुळे ही निवडणूक आपण कधीही विसरू शकणार नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

ते पालघर जिल्ह्यातील तलासरी इथं आभार सभेत बोलतं होते. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पालघर निवडणुकीतील पराभव मी खिळाडू वृत्तीने आणि कोणत्याच परीने मान्य करायला तयार नाही. उन्हामुळे जर यंत्र बंद पडतील मग चाचण्या कसल्या घेतल्या. नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली याला लोकशाही म्हणतात का? असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

तसेच भाजपसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेना सर्व जागा स्वबळावर लढवणार असून, श्रीनिवास वनगा हेच शिवसेनेचे पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असणार आहेत असं देखील त्यांनी म्हंटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!