Share

“शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी..” – रावसाहेब दानवे

Published On: 

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार यांच्यावर दानवे यांनी टीका केलीय. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे कान पकडले पाहिजेत. शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झालीय, अशा शब्दात दानवे यांनी शरद पवारांवर सडेतोड टीका केली.

तसेच रावसाहेब दानवे म्हणाले, “ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. बाहेर पडावे आणि काम करावं, असं दानवे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी. पण जे दाऊदला मदत करतात त्यांना हे सध्या मदत करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. शरद पवार यांनी काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादीचे कान धरले पाहिजेत पण शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झाली आहे”, अशी खोचक टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

संजय राऊतांवर टीकास्त्र –

आमचा रंग ओरिजिनल आहे, रंग कुणाचा चांगला आहे, हे निवडणुकीत ठरतं, शिवसेनेचा रंग तेंव्हाच फिका पडला जेव्ह त्यांनी दाऊदच्या माणसाला साथ दिली आमचं सरकार येणार आहे, आणि पुढची 25 वर्षे आमचं सरकार टिकणार आहे, असं आवाहन रावसाहेब दानवे यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!