Share

Maharashtra Budget Session : राज्यपालांनी का सोडले अर्धवट भाषण? 

Published On: 

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आज सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाविकास आघाडीच्या आमदारांच्या विरोधाचा जोरदार सामना करावा लागला. राज्यपाल कोश्यारी सभागृहाला संबोधित करत असताना सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे भगतसिंग कोश्यारी यांना आपले भाषण अर्धवट सोडावे लागले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकेरी शब्दात उल्लेख करत. गुरु समर्थ रामदास स्वामी नसते तर आज छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते?, असे वक्तव्य केले होते.

यामुळे त्यांना आज सत्ताधारी आमदारांचा सामना करावा लागला. सभागृहाबाहेरही आमदारांचा निषेध सुरूच होता. राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी राज्यपालांच्या निषेधार्थ चक्क ‘शिर्षासन’ केले. यावेळी सत्ताधारी आमदारांनी राज्यपालांवर तिखट शब्दात टीका केली. या आधी भगतसिंग कोश्यारी यांना राज्यभरात निदर्शनांना सामोरे जावे लागले होते. त्यांच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. दरम्यान विरोधकांनी देखील इडीच्या ताब्यात असलेले अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे जनसामान्यांच्या प्रश्नासाठी असलेले अधिवेशन आज राजकारण्यांच्या गदारोळात संपले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!