🕒 1 min read
उत्तराखंड : १४ फेब्रुवारीपासून उत्तराखंडमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यापूर्वी (Uttarakhand election 2022) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमध्ये ‘विजय संकल्प सभा’ ला संबोधित करताना कॉंग्रेसवर (Narendra Modi criticism of Congress) निशाणा साधला. गेल्या दहा वर्षांत उत्तराखंडची जनता काँग्रेसला लोकसभेत शून्य देत आहे. असा टोला मोदींनी लगावला आहे.
तसेच काँग्रेस पक्षाची एकच ओळख आहे ,सत्ता आली की त्यांचा भ्रष्टाचार बेलगाम होतो आणि सत्ता गेली की त्यांना चीड येते.त्यामुळे पाच वर्षांपासून ते विधानसभेच्या सत्तेबाहेर आहेत. काँग्रेसने उत्तराखंडमधील जनतेला वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित ठेवले. पाण्यासाठी माता-भगिनींना डोक्यावर हंडे घेऊन दूरवर जावे लागत होते. मात्र आम्ही ‘जल जीवन’ मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाईपद्वारे पाणी पोहोचवण्याची मोहीम सुरू केली. त्यामुळे आज उत्तराखंडमधील सुमारे 8 लाख घरांपर्यंत पाईपने पाणी पोहोचत आहे. असे मोदींनी म्हटले आहे.
कांग्रेस पार्टी की एक ही पहचान है…
सत्ता आती है तो इनका भ्रष्टाचार बेलगाम हो जाता है, और सत्ता जाती है तो बुरी तरह बौखला जाते हैं।
पिछले दस सालों से लोकसभा में उत्तराखंड के लोग इन्हें शून्य दे रहे हैं। ज़ीरो।
विधानसभा में भी पाँच साल से ये सत्ता से बाहर हैं। pic.twitter.com/0BpffWdpIH
— BJP (@BJP4India) February 10, 2022
दुर्दैवाने या राज्याची कमान अनेक वर्षे त्यांच्या हाती गेली, ज्यांनी उत्तराखंडला अस्तित्वात येण्यापासून नेहमीच रोखले होते. जनतेच्या स्वप्नांचा चुराडा करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. दोन्ही ठिकाणी त्यांची सरकारे असताना उत्तराखंडला ब्रेक लावून त्यांनी मागे आणले. असा आरोपही मोदींनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- कर्नाटकातील हिजाबचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईतील ‘या’ कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी
- मनसेची भूमिका हिंदुत्वाची, हिजाब वादावर मनसेची प्रतिक्रिया
- IND vs WI: काय सांगता…! सामन्यात केल्या फक्त १८ धावा तरी कोहलीने केला नवा विक्रम
- हिजाब प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायलायचा नकार
- ‘किंग’ बनायचयं, ‘किंग मेकर’ नाही; शिवतीर्थ’वरील बैठकीनंतर मनसेची भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
