🕒 1 min read
नवी दिल्ली: पंजाबच्या (Panjab) फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या निष्काळजीपणाबद्दल केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या प्रकरणावरून भाजपने कॉंग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यामुळे राजकारणात चर्चेला आता नवीन विषय मिळाला असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं (Home Ministry) पंजाब सरकारकडे (Punjab Government) सविस्तर अहवाल मागितला होता. त्यावर पंजाबच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृह सचिवालयाकडे लिखित रिपोर्ट सादर केला असून याप्रकरणी स्थापन केलेली समिती पुढील तीन दिवसांत अहवाल सोपवणार असल्याची माहिती दिली आहे.
पीएम को मौत के कुएं में फंसाना कोई इत्तेफाक नहीं यह साजिश थी..महादेव की कृपा से बच गए।
इसकी उच्चस्तरीय सही जांच होगी तो यह साज़िश पंजाब के सीएम ऑफिस तक ही बल्कि उनके तार ऊपर तक जुड़ेंग़े।
ऐसा प्रतीत होता है की उनकी हत्या ड्रोन या टेलीस्कोपिक गन से भी हो सकती थी। pic.twitter.com/4XU1PWWDGb— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) January 7, 2022
या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेच्या त्रुटीवरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्याही होऊ शकली असती, पंतप्रधानांना मरणाच्या विहिरीत अडकवणं हा काही योगायोग नव्हता. याची उच्चस्तरीय चौकशी झाली तर हे षडयंत्र पंजाबचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयापर्यंतच नाही, तर त्याच्याही वर त्याचे धागेदोरे सापडू शकतात. त्यांची हत्या ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गननं झाली असती, असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘त्या’ चर्चेवर पटोलेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, …त्यात गैर काय?
- भाजप नौटंकीबाज, युपीची निवडणूक लढण्यास काँग्रेस तयार-नाना पटोले
- मोदींबद्दल अपशब्द वापरल्यामुळे व्यक्तीला मारहाण, थुंकी चाटायला लावली; भाजप कार्यकर्त्यांचा प्रताप
- वृद्ध शेतकऱ्याने कानशिलात लगावल्यानंतर ‘त्या’ भाजप आमदाराने दिले स्पष्टीकरण
- “जनतेला आज पश्चाताप होत असेल की, त्यांनी एका भित्र्या व्यक्तीला देशाचा नेता म्हणून निवडले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
