Share

‘दुर्दैवाने तिसरी लाट आली तर…’; राजेश टोपेंचा इशारा

Published On: 

पुणे: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरत आहे. कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी तसेच लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई व पुण्यातील आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.

पुण्यात आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मास्क नसेल तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार नंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, पहिल्या लाटेत वीस लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत ४० लाख लोक कोरोनाबाधित झाले, दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यात जवळपास ८० लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज आहे. परंतु, सध्या केंद्राने फक्त आयसीयुसाठीच लागणाऱ्या मनुष्यबळाला मान्यता दिली असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!