Share

‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. रविवारी(२६ डिसें.) या संसदेचा समारोप झाला. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या धर्म संसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल(Mahatma Gandhi) अपशब्द वापरले. फक्त एव्हढेच नाही तर महात्मा गांधींवर शिवीगाळ करत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले. या प्रकरणानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल(Bhupesh Baghel) यांनी याविषयी भाष्य केले आहे.

यासंदर्भात भूपेश बघेल यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बापूंना शिव्या देऊन, समाजात विषाच्या उलट्या करून, एखाद्या भोंदूला वाटत असेल की आपण आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होऊ, तर तो त्याचा भ्रम आहे. तसेच या भोंदूंच्या दोन्ही गुरुनेही ऐकावे..भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल… त्याला ना संविधान सोडणार आहे ना जनता स्वीकारणार आहे’, असे बघेल म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर कालीचरण महाराज यांच्यावर रविवारी सायंकाळी आयपीसीच्या कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!