🕒 1 min read
मुंबई: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. मात्र आता शिवसेनेचेच आमदार आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
‘मंत्रालयात दर बुधवारी काही विशिष्ट मंत्रीच दिसतात. जर लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांचा संपर्कच होत नसेल तर काय करावं? करोनाच्या स्थितीत समजून घेऊ शकतो. मग अजित पवार कसे काय रोज मंत्रालयात दिवसभर थांबतात? कसे लोकांना भेटतात? असा प्रश्न आमदार आशिष जयस्वाल यांनी अधिवेशनात केला. यावरच ‘मुख्यमंत्री महोदय, इथे लक्ष द्या…’ असा खोचक टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री महोदय, इथे लक्ष द्या… pic.twitter.com/O1JMvHWMXG
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 25, 2021
दरम्यान ही आमदारांच्या मनातील खदखद असून कुठे तरी व्यक्त करावी लागेल. राज्य शासनात काम करणारे लोकप्रतिनिधी काम करत नसतील तर सरकारने किमान बुधवारी सर्व मंत्र्यांना मंत्रालयात उपलब्ध राहण्यास सांगावं अशी विनंतीही आमदार आशिष जयस्वाल यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांच्या ‘अतरंगी’ फोटोनंतर नितेश राणेंनी शेअर केला ‘हा’ फोटो; म्हणाले,’ओळखा पाहू कोण?’
- ‘अजित पवारांना नेहमीच वाटते की, माझा परखडपणा किती मोठा आहे पण..’, चंद्रकांत पाटीलांची टीका
- मोदी-योगींची तुलना थेट शिवाजी महाराज अन् महाराणा प्रतापांसोबत; भाजप नेत्याचा प्रताप
- योगी सरकार देणार १ कोटी युवकांना मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन
- नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी करायला हवे – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
