Share

‘अजित पवारांना नेहमीच वाटते की, माझा परखडपणा किती मोठा आहे पण..’, चंद्रकांत पाटीलांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सरकारी सेवेत विलीनीकरणाचा प्रत्येकाचा हट्ट पूर्ण करता येणार नाही, त्यामुळे विलीनीकरणाचा विषय एसटी कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाकावा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दिला. दरम्यान यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘अजित पवारांना नेहमीच वाटते की, माझा परखडपणा किती मोठा आहे पण अशा परखडपणाने समाज चालत नाही. तीच गोष्ट नीट सांगायची असते. समजा तुम्हाला असे वाटते की, विलीनीकरण शक्य नाही, तर का शक्य नाही? तुम्ही जर जीवन प्राधिकरणाचे विलीनीकरण केले, तर एसटीचे का करणार नाही? त्यातून तुम्हाला समजा टेक्निकल अडचण वाटत असेल की, एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी करणार का? अडचण काय तुमची, मला हे कळत नाही की, शेवटी राज्याची तिजोरी आहे कशासाठी? दरम्यान २३ लाख कोटी राज्याचे सकाळ उत्पन्न झाले. यापैकी २५ टक्के म्हणजेच ६ लाख कोटी राज्याला कर्ज घेता येते. देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मूनगंटीवार यांनी खूप काटेकोरपणे राज्य चालवल्यामुळे १५ कोटीच्या वर राज्याला कर्ज घेता आले नाही. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालय अंतिम निकाल देईलच, पण सरकारने बहुतांशी मागण्या पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे. अन्यथा गिरणी कामगार जसे देशोधडीला लागले तशी वेळ एसटी कर्मचाऱ्यांवर येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एसटी मंडळाने कारभार सुधारावा आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, तसेच भाडेवाढीच्या पर्यायांचा विचार करण्याची सूचना अजित पवार यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!