Share

‘माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही, काही लिखाणावर आक्षेप होता’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचारादरम्यान पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून न्यूमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. बाबासाहेबांच्या निधनानंतर सर्वच राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही. काही लिखाणावर आक्षेप होता. ब. मो. पुरंदरे (बळवंत मोरेश्वर पुरंदरे) यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. अनेकदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वैचारिक पातळीवर उघडपणे विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन पुरंदरेंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलंय.

पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा इतिहास समोर ठेवला. मोठी कामगिरी करत आयुष्य खर्च केल्यानंतर काही लोक त्यामध्ये उणिवा काढत असतात, हे बाबासाहेबांच्या बाबतीतही केले गेले. इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याचं योगदान मात्र विसरता येणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!