मुंबई: विजयादशमीनिमित्त काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त शिवसैनिकांना संबोधित केले. त्यात त्यांनी केंद्रातील भाजप पक्षाला खडेबोल सुनावले. सुरुवातीला आपल्या भाषणाची सुरवात त्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन केली त्यानंतर त्यांनी
राज्यघटनेनुसार देशात संघराज्य व्यवस्था असून केंद्राइतकेच अधिकार राज्यांना आहेत. राज्यांच्या दैनंदिन कारभारात केंद्राची लुडबुड आणि दडपण नसावे ही भूमिका सर्व राज्यांनी घेण्याची वेळ आली आहे. असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
यावेळी त्यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून भाजपमधील उपटसुंभ नवहिंदूंमुळे देशात हिंदुत्वाला धोका असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हिंदुत्वाचे तुमचे विचार तुमचीच माणसे ऐकणार नसतील तर काय उपयोग, असा सवालही त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केला. तुम्ही म्हणता आपले सर्वाचे पूर्वज एक होते. मग उत्तर प्रदेशातील ज्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते काय, हे सर्व प्रकार तुम्हाला मान्य आहेत काय, असा संतप्त सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.
सत्तेचे व्यसन हे अमली पदार्थासारखेच घातक असते, याचा बंदोबस्त कोण करणार? अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे ते व्यसन करणाऱ्या माणसाचे घरदार उद्ध्वस्त होते. पण सत्तेचे व्यसन लागलेल्यांमुळे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी व्यसन देशातून नष्ट केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘अंगात धमक असेल तर अंगावर या, ईडी, सीबीआयची मदत घेऊ नका’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- प्रदीर्घ काळानंतर लवकरच’सकिनाची प्रेमकथा’;सनी देओलने केली घोषणा..!
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
