Share

देशात लोकशाही राहिली नाही असेच चित्र; खासदार फौजिया खान यांचा केंद्र सरकारवर हल्ला

Published On: 

परभणी :  लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारात महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून रॅली काढण्यात आली. यावेळी आपली लोकशाही कुठे आहे, असा प्रश्न करत खासदार फौजिय्या खान यांनी केंद सरकारवर जोरदार टीका केली.

परभणीत महाविकास आघाडीच्या वतीने रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून लखीमपूर येथील घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या बंदला जिल्ह्यातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

उत्तर प्रदेशातील घटनेने जनरल डायरने केलेल्या जालीयनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिली असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला. ही घटना दुर्दैवी असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलनाला शिवसेना खासदार संजय जाधव, खा. फौजीय्या खान, आ. सुरेश वरपुडकर, आ. राहुल पाटील, तुकाराम रेंगे पाटील, प्रा. किरण सोनटक्के, विशाल कदम, नदीम इनामदार आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!