Share

औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!

Published On: 

औरंगाबाद : गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र अपघाताची मालिका वाढतच आहे. बुधवारी दुपारी अर्धाच तास जोरदार बरसलेल्या पावसाने शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा सत्र न्यायालयात महाकाय वृक्ष कोसळून वाहनांचे नुकसान झाले, तर अनेक वाहने चकनाचूर झाली आहेत.

औरंगाबाद शहरासह मराठवाड्यात गेल्या काही दिवसात पावसाने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला होता. शहरात पडणाऱ्या पावसाने आतापर्यंत सरासरी ओलांडून सरासरी पेक्षा १६० टक्के अधिक पाऊस पडल्याचे नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. शनिवारी पहाटेच्या पावसाने तर शहरात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली होती. पादचारी पूल वाहून गेल्याने नागरिकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क जवळपास तुटला होता.

बुधवारी दुपारी झालेल्या पावसाने शहरात पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा न्यायालयात महाकाय वृक्ष कोसळले आहेत. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहने चकनाचूर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी अशाप्रकारे झाडे कोसळल्याने रस्ते जॅम झाले आहेत. पावसाने होणाऱ्या नुकसानात दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!