मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातही पाऊस होत आहे.
मराठवाड्यातील एकूण क्षेत्रापैकी सुमारे ७० टक्के क्षेत्रातील सोयाबीन मातीमोल झाले आहे. तर कापसासह इतर पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारने तीन दिवसांत पिक नुकसानीचे पंचनामे करावे, जिथे पुरामुळे प्रत्यक्ष जाऊन पंचनामे शक्य नाही तिथे ड्रोनच्या मदतीनं पंचनामे करावे आणि सात दिवसांत हेक्टरी 25 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत भाष्य केलं आहे. गेल्या दोन दिवसात मराठवाड्यात सुरु असलेल्या पावसामुळे 11 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली आहे. तर राज्यात आतापर्यंत नुकसानाचे पूर्ण पंचनामे झाल्यावर आकडेवारीत आणखी भर पडणार आहे. त्यामुळं राज्यात किती जिल्हे बाधित झालेत याची माहिती घेऊन ओला दुष्काळ जाहीर करायचं की नाही याचा निर्णय घेऊ असं विजय वड्डेट्टीवार यांनी म्हटले आहे.
गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे नदी, नाले यांचे प्रवाहच बदलून गेलेत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. यासोबतच वर्षभरात आलेल्या आपत्तींबाबत केंद्र सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करुनही केंद्र सरकारनं कोणतीही ठोस अशी मदत केली नाही, अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती
- महिला शिल्पकाराचा कमाल…पवारांचा ९ फूट उंच मेटलचा पुतळा साकारला; सुळेंनी केलं कौतुक
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- भुजबळांना भेटलोही नाही; अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणी निकाळजे यांचा दावा
- गोव्यात किती विकास झाला हे संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना विचारावं; राणेंनी डिवचलं

