Share

‘मुख्यमंत्र्यांचे कोकणातील आश्वासन अजून हवेतच आणि आता मराठवाड्यासाठी नव्या वाफा…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती उद्भवली आहे. जवळपास २५ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून नुकताच घेतला.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे असून सर्वोतपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आणि आज मराठवाड्यातील सर्व पालकमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांना विविध सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

सध्या सुरु असलेल्या बचाव कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, सततच्या पावसाने अनेक फळबागांचेही नुकसान झाले आहे, शेतातील पिके वाहून गेली आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनावर आता भाजपकडून शरसंधान साधण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील महापुरावेळी  दिलेलं मदतीचं आश्वासन पूर्ण न केल्याचं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.  ‘कोकणाला दिलेली आश्वासने अजून हवेतच आहेत. मराठवाड्यासाठी या नव्या वाफा…’ अशी खोचक टीका भातखळकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!