नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यातच आता देशात कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी भारतात टोसिजिजुमॅबच्या औषधाला वापरासाठी डीसीजीआयकडून मंजुरी देण्यात आल्याचं हेटेरो कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.
कंपनीने देशात मेंटोसीलिजुमॅब (टोसीरा) औषधाला मिळालेली मंजुरी आपल्यातील तांत्रित क्षमता आणि कोविड विरुद्धच्या लढ्यासाठीची कटिबद्धता दाखवून देणारी आहे. औषधाच्या समान वितरण पद्धत सुनिश्चित करण्यासाठी सरकारसोबत एकत्रितरित्या काम करू, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मिलिंद सोमणची रुग्णालयातील पोस्ट पाहून नेटकरी संतापले
- संजय राऊतांना अटक करा ; भाजपची मागणी तर राऊत म्हणतात…
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का, सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले
- वाढीव रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना अक्रियाशील घोषित करुन नये, आ. पवार यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
