🕒 1 min read
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये. देशमुखांच्या मागण्या कोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता देशमुखांचा शेवटचा पर्यायही बंद झाला आहे. देशमुखांविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत देशमुखांनी कोर्टात याचिका केली होती.
याचिकेत देशमुखांनी म्हटले होते की, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपासाला स्थगिती द्यावी, ईडीने पाठवलेले समन्स रद्द करावेत, अटकेसारखी गंभीर कारवाई करण्यास मनाई करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळली. आपण याबाबत सीआरपीसीच्या अनुषंगाने याचिका करावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.
महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना ED चे समन्स चुकावल्यास अटक होणार का? ही चर्चा महाराष्ट्रासाठी लांछानास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्या नंतर माजी गृहमंत्र्यांनी सरकारी यंत्रणांना सहकार्य करणे नीतिमत्तेला धरून होईल. थोडी तरी लाज बाळगा…. pic.twitter.com/pnDaahLsUT
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 17, 2021
दरम्यान, देशमुख अडचणीत आल्यानंतर आता भाजप पुन्हा आक्रमक झाली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत देशमुख यांना डिवचले आहे. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना ED चे समन्स चुकावल्यास अटक होणार का? ही चर्चा महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्या नंतर माजी गृहमंत्र्यांनी सरकारी यंत्रणांना सहकार्य करणे नीतिमत्तेला धरून होईल. थोडी तरी लाज बाळगा…. असा टोला त्यांनी देशमुख यांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉर्ड्सवर कोहलीचा मोठा विक्रम, वेस्ट इंडिजच्या महान कर्णधाराला टाकले मागे
- केएल राहुलने संपवला 44 वर्षांचा दुष्काळ, अशी कामगिरी करणारे गावस्कर होते पहिले भारतीय सलामीवीर
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’
- कोविड प्रतिबंधाकरीता नागरिकांनीही प्रयत्न करावेत – आदित्य ठाकरे
- ‘एक गोष्ट लाख सत्य, अमेरिकेने पूर्ण जगाशी गद्दारी केली अन्…’; जितेंद्र आव्हाड संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

