Share

‘शिवसेना टिकवायची असेल तर…’; रामदास आठवलेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला

Published On: 

अमरावती : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर, विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत जात शिवसेनेनं महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात महाविकास आघाडीतील कुरबुरी समोर आल्या असल्या तरी हे सरकार ५ वर्षे टिकेल अशी खात्री तिन्ही पक्षातील नेते व्यक्त करत आहेत.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनेकदा शिवसेनेला पुन्हा भाजपसोबत येण्यासाठी साद घातली आहे. आता पुन्हा एकदा आठवलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना टिकवायची असेल तर भाजपसोबत युती करा असा सल्ला दिला आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते.

‘जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी. नाहीतर शिवसेनेचं 2024 मध्ये खूप मोठं नुकसान होईल. या सरकारमध्ये नेहमी भांडण होत असतात. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही,’ असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!