श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय युवा संघाने श्रीलंकेविरुद्ध आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.
भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. अशात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारनेजिंकण्याची अशा कायम ठेवत दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी करत श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.
दरम्यान, श्रीलंका संघाला मालिका गमावल्यानंतर दुसऱ्या मालिकेतील ‘स्लो ओव्हर रेट’साठी दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत एक षटक कमी गोलंदाजी केल्याबद्दल आयसीसीने श्रीलंकेच्या संघाला सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावला. आयसीसीच्या नियमानुसार, निर्धारित वेळेत सर्व षटके गोलंदाजी करावी लागते. संघ असं करू शकला नाही तर त्याला सामना शुल्कापैकी किमान २० टक्के दंड ठोठावते.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला दुखापतीने ग्रासले, बीसीसीआय करणार निवड समितीशी चर्चा
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- अखेर रसिका आणि असिफ यांचा बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह पडला पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

