Share

इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला दुखापतीने ग्रासले, बीसीसीआय करणार निवड समितीशी चर्चा

Published On: 

मुंबई : गेल्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यात भारताने जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना गमावला. या सामन्यानंतर भारतीय संघाला २० दिवसाची सुटी देण्यात आली. मात्र ही सुटी संपण्यापुर्वी भारतीय संघाला दुखापतीने ग्रासले आहे.

सुटीदरम्यान सलामीवीर शुभमन गीलला दुखापत झाल्याने तो इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला. यानंतर डरहम येथे काउंटी इलेव्हन संघासोबत सराव सामन्यादरम्यान आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडले आहे. यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या २४ खेळाडूपैकी केवळ २१ खेळाडू शिल्लक आहेत. यामुळे इंग्लंड दौऱ्यावर दोन भारतीय खेळाडूची निवड करावी अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात बीसीसीआय लवकरच निवड समितीसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन महिने चालणाऱ्या इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय खेळाडूंना दुखापतीचा धोका संभावू शकतो. त्यामुळे भारतीय संघाला पर्यायी खेळाडूंची गरज पडू शकते. प्रारंभी शुभमन गील दौऱ्यातून बाहेर पडल्यावर त्याच्या जागी पर्यायी खेळाडूची मागणी संघ व्यवस्थापनाने केली होती. मात्र त्यावेळी निवड समितीने नकार दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता जखमी खेळाडूंची संख्या वाढल्यानंतर निवड समिती लवकरच नव्या खेळाडूंची निवड करण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!