Share

मुंबई पावसाचा हाहाकार; चेंबूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना अमित शाह यांनी दिला धीर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईसह उपनगरमध्ये काल रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळली. दरडीचा भार संरक्षक भिंतीवर आल्याने ही भिंतच घरांवर कोसळली.

अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती घेऊन त्यांनी ट्विट केलं आहे. ‘ही घटना हृदयद्रावक असून मी स्तब्ध आहे. या दुर्घटनेत कुटुंबिय गमावलेल्या नागरिकांच्या दुःखात मी सहभागी आहे. न भरून निघणाऱ्या या नुकसानाप्रती मी संवेदना व्यक्त करतो,’ असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!