Share

महिन्याभरात एकही रुग्ण न आढळलेल्या गावात १५ जुलैपासून शाळा सुरू होणार-वर्षा गायकवाड

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. विद्यार्थांना शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोविड- मुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली आहे.

दरम्यान, आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार असून यासाठी गावाने जबाबदारी स्वीकारावी, अशी माहिती पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शुक्रवारी हिंगोली येथे दिली. मंत्री गायकवाड हिंगोली जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आहेत.

सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
मागील महिनाभरापासून एकही रुग्ण न आढळलेल्या ठिकाणी वर्ग सुरू केले जाणार आहेत. शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करावे विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात मनाई करण्यात आली आहे. शाळा सुरू करताना मुलांना टप्याटप्यात शाळेत बोलविण्यात यावे त्यासाठी वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी, दुपारी नियोजनानुसार वर्ग सुरू करावे एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा. यासह इतर विविध उपायोजना करण्याच्या मार्गदर्शक सुचनाही शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार असून ही समिती शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!