लातूर : ”आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे व्यक्तीगत मत आहे. या संदर्भात काँग्रेस आपली भूमिका पक्ष पातळीवर व्यापक चर्चा केल्यानंतरच जाहीर करेल,” असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सावध भूमिका घेतली आहे.अशोक चव्हाण रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख आदी उपस्थित होते.
नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण
”आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे. संविधानाने दिलेले आरक्षण हे कायम राहिलेच पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. आर्थिक निकष किंवा शेतकऱ्यांना आरक्षण या संदर्भात पक्षीय पातळीवर याची व्यापक चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल,”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
