🕒 1 min read
उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे, मात्र अशातच आता म्युकरमायकोसिस या नवीन आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरी कडे म्युकरमायकोसिस, यात होरपळून निघतोय सामान्य माणूस. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या व त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ३०० च्या टप्प्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत रविवारी मोठी घट दिसली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमीच असून २१९ जणांची नोंद बाधितांमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे ५७७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ३०० च्या टप्प्याने दरराेज कोरोना रुग्ण आढळून येत होते. त्या अगोदर तर ७०० ते ८०० चा टप्पा जिल्ह्याने पाहिला होता.
जिल्ह्यात रविवारी २१९ रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. रविवारी अशा ५७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ३२०६ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्यसा ५४ हजार ६५६ वर पोहोचली असून यापैकी बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५० हजार २१७ आहे. आतापर्यंत तीन लाख ९६६ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये निगेटीव्ह रिपोर्ट दोन लाख ४६ हजार ३१० आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या घटत असली तरी मृत्यू कमी होण्याचे नाव घेत नाहीत. रविवारी आठ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूचा आकडा १२३३ वर पोहोचला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महेश मांजरेकर पुन्हा बायोपीककडे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जिवनपट उलगडणार मोठ्या पडद्यावर
- देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
- अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे- अजित पवार
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- मोठी बातमी : बारावीच्या परीक्षा होणार की नाही ? सर्वोच्च न्यायालय दोन दिवसात देणार निर्णय


