🕒 1 min read
मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. हे चक्रीवादळ काल मुंबई किनारपट्टीच्या बाजूने गुजरातच्या दिशेने पुढे गेलं.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. तर, एकाबाजूला खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. या परिस्थितीवरून भाजप नेते निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
त्यांनी ट्विटसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नागरिक गुडघाभर पाण्यामधून वाट काढत असल्याचं दिसत आहे. नेहमीची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे पाणी तुंबणे, खड्डे पडणे हे काही मुंबईकरांसाठी नवं नाही. मात्र, यंदा मान्सून सुरु होण्याआधीच चक्रीवादळामुळे हि स्थिती पाहायला मिळत असून मुंबई महापालिकेच्या तयारीची ‘पोलखोल’ केली आहे.
हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे… वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही. pic.twitter.com/f90KTRvObR
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 18, 2021
यामुळेच निलेश राणे यांनी, “हे चित्र वरळी मतदारसंघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदींना बदनाम करण्यासाठी काँग्रेस टूलकिट वापरत असल्याचा आरोप
- पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त पोस्टरप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
- खतांच्या किमतीवरून रक्षा खडसे यांचा भाजपला घरचा आहेर ,म्हणाल्या…
- ‘कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांच्या शाळेची फी, बस फी सर्वच शाळांनी माफ करावी; किंबहुना…
- खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या; केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटलांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
