Share

पश्चिम बंगाल हिंसाचार; भाजपच्या ७७ आमदारांना केंद्राकडून सुरक्षा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसाचाराचा भडका उडाला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यात या पार्श्वभूमीवर भाजपच्या नवनिर्वाचित ७७ आमदारांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व आमदारांना निमलष्करी दलाच्या जवानांची सुरक्षा मिळणार आहे.

बंगालमध्ये निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत अनेक भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हिंसाचार लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने भाजपच्या ७७ आमदारांना निमलष्करी दलाच्या जवानांचे सुरक्षा कवच देऊ केले आहे. यात सीआयएसएफ आणि ‘केंद्रीय राखीव पोलीस दल’ अर्थात सीआरपीएफचे जवान भाजपच्या आमदारांना पहारा देणार आहेत. या संबंधित प्रस्तावाला केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी प्रदान केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बंगालमधील राजकीय हिंसाचार आणखी रौद्रावतार धारण करत असल्यामुळेच भाजप आमदारांची सुरक्षा आणखी कठोर करण्यात आली आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने पाठवलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या चमूने परिस्थितीची पाहणी केली. या संबंधित अहवालानंतर भाजप आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दलांचे जवान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!