🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या वाढत्या संकटात गगनाला भिडलेल्या इंधन दरावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात वेळोवेळी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करत सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोलचे दर २७ पैसे, तर डिझेलचे भाव ३० पैशांनी वाढविल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सरकारने पेट्रोल-डिझेलचा समावेश वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीमध्ये करावा, तसेच जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत सरकारने उत्पादन शुल्कात करण्यात आलेली वाढ मागे घेतली पाहिजे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. १३० कोटी भारतीय आजघडीला कोरोना महामारीशी दोन हात करत आहेत; परंतु भारतीय जनलूट पार्टीची (भाजपा)सर्रासपणे लूट सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
मोदी सरकारने गेल्या ८ दिवसांमध्ये पेट्रोलचे भाव १ रुपया ४० पैसे आणि डिझेलचे दर १ रुपया ६३ पैशांनी वाढवले. खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या काँग्रेस सरकारच्या काळातील तुलनेत एक चतुर्थांशने कमी आहेत; परंतु मोदी सरकार वारंवार इंधन दरवाढ करत सामान्य जनतेचे तेल काढत असल्याचे सुरजेवाला म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला द्या, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोपमुक्त करण्याची विनंती करणे आरोपीचा अधिकार-सर्वोच्च न्यायालय
- अडचणीत वाढ; परमबीर सिंहांविरोधात तक्रारीच्या चौकशीचे गृहविभागाचे आदेश
- आता कुठे गेले अंध भक्त? मोदींनी उद्धव ठाकरेंचे कौतुक करताच स्वामींचा टोला
- ‘टीका करण्याऐवजी सल्ले द्या’, राजनाथ सिंहांचा काँग्रेसला टोला


