🕒 1 min read
परभणी : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २०२१ – २०२२ या शैक्षणिक वर्षात १ मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १३ जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी ग्राह्य धरावा, पुढील शैक्षणिक वर्षात १४ जून पासून शाळा सुरु कराव्यात, असे आदेश शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी शुक्रवारी काढलेल्या पत्रकाद्वारे दिले आहेत.
शाळातून उन्हाळ्याची, दिवाळीची सुट्टी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सवात, नाताळासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या परवानगीने देण्यात येत आहे. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२. २ नूसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत. याची दक्षता घ्यावी, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्यासंदर्भात कोरोना ( कोविड १९) बाबत तत्कालीन परिस्थिती विचारात घेवून शासनस्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील, ते परिस्थितीनुसार संचालनालयाकडून सांगण्यात येणार आहेत, असेही या वेळी म्हटले आहे. कोराेनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. विनामास्क फिरु नये, तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. सॅनेटायझरचा वापर नियमीतपणे करावा. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर देखील पडू नये.
- ‘उद्धवजी, आपण फक्त मुंबईचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात याची ग्वाही मिळेल अशी अपेक्षा करतो’
- सकारात्मक! लातूर मधल्या या आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात
- १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण, जिल्हयासाठी हव्यात २० लाख लसी!
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा २३ वा दिक्षांत समारंभ ४ मे रोजी
- ‘…त्यामुळे मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका, विनाकारण बाहेर पडू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
