🕒 1 min read
नागपूर : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्याला मदत करण्यात आलेली नाही. राज्य शासन इतर जिल्ह्यांना मदत करत असले तरी विदर्भाला मुद्दाम डावलले जात असल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यात तत्काळ मदत मिळावी यासाठी त्यांनी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला.
या संदर्भात बावनकुळे म्हणाले की, ‘राज्यशासनाद्वारे नागपूर – विदर्भाला अमानवीय रित्या कोरोना उपाययोजनांबाबत बाजूला टाकण्यात येतंय. रेमेडिसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय मदतीची मुक्तहस्ते भेदभावात्मक उधळण आम्हांला वगळता सर्वत्र होत आहे. आमची माणसं रोज दूर होत आहेत, रडत आहेत, कोसळत आहेत. राज्य शासनाने न्याय देत नागपूर-विदर्भावरचा पाशवी आसूड रोखत माणुसकी दाखवावी.’
राज्यशासनाद्वारे नागपूर – विदर्भाला अमानवीय रित्या कोरोना उपाययोजनांबाबत बाजूला टाकण्यात येतंय . रेमेडिसिवीर इंजेक्शन , ऑक्सिजन आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय मदतीची मुक्तहस्ते भेदभावात्मक उधळण आम्हांला वगळता सर्वत्र होत आहे .1/2 pic.twitter.com/mg5Z0OUBka
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 19, 2021
नागपूरला तत्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. यात कोणतेही राजकारण करण्याची आमची इच्छा नाही. राज्य सरकारमधील वजनदार मंत्री त्यांच्या जिल्ह्यातील एका रुग्णासाठी ३ रेमडेसिवीर इंजेक्शन राखून ठेवत आहे. नागपूरमध्ये मात्र, गेल्या ३ दिवसांपासून इंजेक्शन मिळालेले नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- देवदूता प्रमाणे रेल्वे पॉईंटमनने वाचवला चिमुकल्याचा जीव, रेल्वेमंत्र्यांनी केले कौतूक
- कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

