🕒 1 min read
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मात्र, आज (१५ एप्रिल) रोजी अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. गर्दी कमी होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे दोन दिवसात कडक कारवाई केली जाणार आहे. सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल न देण्याबाबत तसेच भाजीपाला व किराणा खरेदी साठी देण्यात आलेल्या सूटमध्ये देखील कपात करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. त्यामुळे जनतेला एक दिवसाचा अवधी आहे. विनंती करतो नियम पाळा, अन्यथा आणखी कठोर नियमांशिवाय पर्याय उरणार नाही असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता महाराष्ट्र शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात’
- ‘आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला’
- कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्री ठाकरेंच पंतप्रधानांना पत्र !
- सर्क्युलरच्या गोंधळामुळे पुण्यात गरिबांना शिवभोजन थाळीसाठी मोजावे लागले पैसे !
- कुस्ती स्पर्धांना परवानगी द्या, कुस्तीपटूंना आर्थिक मदत देण्याची मागणी


