🕒 1 min read
पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. मतदान अवघ्या काही दिवसांवर आल्याने प्रचारसभांसह राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.
आता भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील शिवाजी चौकात प्रचारसभा घेतली. यावेळी अजित पवारांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय?, हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही’, अशा शब्दांत अजित पवार यांनी फडणवीस यांना आव्हान दिले आहे.
दरम्यान, मंगळवेढ्यातील सभेत ‘अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’, असे विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते. हे महावसुली सरकार आहे. या सरकारचा अन्याय, दूराचार आणि भ्रष्टाचार रोखण्याची व हे सरकार चालवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील नागरिकांना मिळाली आहे, ती दवडू नका, असेही फडणवीस म्हणाले होते. त्याचा अजित पवार यांनी समाचार घेतला.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची वेळ आणू नका, पालकमंत्री अमित देशमुख यांचे आवाहन
- जेव्हा खासदार मुंडे डॉक्टर म्हणून रुग्णालयात जातात!
- सामना जिंकल्यावर ट्रेन्ट बोल्ट म्हणाला ”बहुत अच्छा”
- शरद पवार यांना ब्रीच कँडीमधून मिळाला डिस्चार्ज; तब्येत उत्तम – नवाब मलिक
- ‘बंद काळात रिकाम्या थाळ्या वाजवून पोट भरणार नाही, भरलेल्या थाळ्याच द्याव्या लागतील’…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

