Share

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

Published On: 

मुंबई: विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही तिरंगा रॅली काढली होती. या रॅलीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. माझा आवाज बसला असला तरी भाजपाचा आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणाच्यात इतकी ताकद नाही. विरोधकांची संविधान बचाव रॅली नाही, तर पक्ष बचाव रॅली आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर बोलतांना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला मारला.

आवाज दणदणीत असूनही कोण दाबतंय, असा टोला आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला आहे. मुंबईत सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनात ते बोलत होते. काल सरकारनं आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीदरम्यानच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचा घसा बसला होता. त्यावर नाव न घेता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठी वृत्तपत्रांचं काम मोठं आहे. मात्र हल्लीच्या काळात अपवाद वगळता विचार करणारे किती पत्रकार शिल्लक राहिले आहेत, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!