🕒 1 min read
चेन्नई : सध्या भारतात आयपीएलचा ‘रण’संग्राम सुरु आहे. कालपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली. यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना हा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. सलामीच्या सामन्यात दोन विकेट्स राखून विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.
जगभरात आयपीएल ही जगातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० लीग म्हणून मनली जाते. आयपीएलचं वेड फक्त भारताचं नव्हे तर जगभरात देखील आहे. याचंच उदाहरण आता लंडनध्ये पाहायला मिळालं आहे. आयपीएल आता निवडणुकीचा मुद्दा झालेला आहे. होय पुढील महिन्यात लंडनध्ये होणाऱ्या निवडणुकीत महापौर पदासाठी पुन्हा अर्ज दाखल केलेल्या सादिक खान यांनी शहरात IPL खेळवण्याचं वचन दिलं आहे.
कोरोना कमी झाल्यानंतर इंग्लंडच्या राजधानीत आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत काम करेन असे आश्वासन खान यांनी दिले आहे.खान यांना लंडनमध्ये आयपीएल सामन्यांचे आयोजन करणार असे वचन तिथल्या नागरिकांनां दिलं आहे. आयपीएलच्या आयोजनानं पर्यटनालाही चालना मिळेल, आणि रोजगार निर्मिती होईल, असे त्यांना वाटते.
महत्वाच्या बातम्या
- विराटच्या एका निर्णयावर युवराजची जहरी टीका
- रुग्णांच्या जीवाशी खेळ; मुदतबाह्य रेमडेसिव्हीरची सर्रास विक्री
- लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचे सूर बदलले, म्हणाले…
- लातूर; बारा लाख शेतकऱ्यांनी भरले ११६० कोटी वीजबिल
- ‘…आणि डिव्हिलियर्सने हा सामना आरसीबीकडे झुकवला’ , रोहितने सांगितलं मुंबईच्या पराभवाचं कारण


