लातूर: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे, वाढत्या प्रादुर्भावामुळे का होईना नागरिकांचा लस घेण्याकडे कल वाढला आहे. दिवसाकाठी ६ जणांना लस दिली जात असून आता दोन दिवस पुरेल एवढ्याच लसीचा साठा आरोग्य विभागाकडे आहे. पुरवठा न झाल्यास जिल्ह्यातील काही केंद्र ही बंद करावी लागणार आहेत.
१७ जानेवारीपासून लातूर जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली होती. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र, सुरवातीला नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. मात्र, सध्या प्रादुर्भाव वाढत असताना लस घेण्याकडे नागरिकांचा कलही वाढला आहे. जिल्ह्यात १ लाख ८२ हजार एवढ्या लसीचा पुरवठा झाला होता. त्यानुसार जिल्ह्यातील १७० केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू होती. बुधवारपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३०हजार नागरिकांना पहिल्या टप्प्यातील लस देण्यात आली आहे. दिवसाकाठी ६ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने समोर ठेवले आहे. सध्या केवळ २० हजार लस शिल्लक आहेत.
दोन दिवसात लसीचा पुरवठा झाला नाही तर जिल्ह्यातील काही केंद्र हे बंद ठेवावी लागणार आहेत. लसीच्या पुरवठ्यापैकी ५०० लस या वाया गेल्या आहेत. ती निकामी ठरली होती. लसीच्या पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाने पत्रव्यवहार केला आहे. तर दोन दिवसात लसीचा पुरवठा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादांच बोलणं टग्यासारखं पण रडणं बाईसारखं : गोपीचंद पडळकर
- मैदान गाजवलं : आरसीबीच्या हर्षल पटेलने मुंबईच्या निम्म्या संघाला माघारी पाठवलं !
- …तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
- आयपीएलची टशन : क्रिस लिनच्या धडाकेबाज खेळीने मुंबई इंडियन्सची स्थिती भक्कम !
- ‘गोड बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमची वाट लावली!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

