🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले आहेत, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता जनतेशी सवांद साधत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलेले आहे.
‘मी तुम्हाला घाबरवायला आलेलो नसून राज्यातील परिस्थिती समोर मांडण्यासाठी आलो आहे. मधल्या काळात आपण कोरोनाला आटोक्यात आणले होते. सर्वांनी एकत्रपणे या संकटाला तोंड दिले होते. मात्र, यानंतर पुन्हा सर्व काही सुरु झालं. समारंभ, सेलिब्रेशन सुरु झाले आणि पुन्हा एकदा कोरोनाची वाढ सुरु झाली. यामुळेच मी किमान एप्रिल अखेरपर्यंत संयम-धीर राखण्याचे आवाहन केले होते,’ असं भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेवर आता कोणते निर्बंध लागू करणार आहेत हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणूनच मी धीर धरण्याचे आवाहन केले होते; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद सुरु
- पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी…
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
