Share

रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट, चर्चांना उधाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे कोणत्या न कोणत्या कारणमुळे सतत चर्चेत असतात. महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण बघता बरेच राजकारणी राज्यपालांची यांची भेट घेताना पाहायला मिळत आहे. त्यातच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या वन डे मालिकेमध्ये भारताने इंग्लंडला २-१ अशी धूळ चारली. त्याआधी २०-२० मालिका ३-२ आणि कसोटी मालिका ३-१ ने विजय मिळवला होता. कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. भारतीय खेळाडूंनी या यशाचं श्रेय प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिले होत.

भारतीय संघातील खेळाडू मुंबईत दाखल झाले असून ते आयपीएलच्या तयारीला लागलेले आहेत. पण रवी शास्त्री यांनी मात्र आज महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पण या भेटीमध्ये नेमकं घडलं तरी काय, हे जाणून घ्यायची इच्छा सर्वांनाच आहे. पण ही सदिच्छा भेट असल्याचे सध्यातरी समजत आहे. पण या भेटीमध्ये नेमका काय संवाद झाला, हे अजून समजू शकलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!