🕒 1 min read
रायपुर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या उपांत्य सामन्यात भारताने १२ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यातील भारताच्या डावात भारताचा सिक्सर किंग युवराजची बॅट पुन्हा तळपली. बुधवारी झालेल्या सामन्यात युवराजने २० चेंडूत ४९ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने गगनचुंबी षटकांराची बरसात केली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने चांगली सुरुवात करुन दिली. सचिनने यावेळी ४२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ६५ धावा केल्या. मात्र सचिन बाद झाला आणि युवराज मैदानात आला. युवराजने तुफान फटकेबाजी करत यावेळी फक्त २० चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावांची खेळी साकारली. युवराजच्या या वादळी खेळीमध्ये सहा षटकारांचा समावेश होता. युवराजने फक्त १० चेंडूंमध्ये हे सहा षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले.
Yuvraj Singh's 19th over ????
Vintage Best#YuvrajSingh pic.twitter.com/kG6SdbnTUx— Jyoti Suman (@Jas23478675) March 17, 2021
या षटकारांनी युवराजच्या चाहत्यांना पहिल्या टी-२० सामन्याची आठवण करुन दिली. त्या सामन्यात युवराजने एकाच षटकात तब्बल चार षटकार लगावले होते . यापूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही दमदार फलंदाजी करत युवराजने षटकारांची बरसात केल्याचे पाहायला मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराजने एकाच षटकात सहा षटकार खेचले होते.
महत्वाच्या बातम्या
- रोमहर्षक सामन्यात विजय मिळवत भारताचा रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात प्रवेश
- भारत-इंग्लड चौथा टी-२० आज; मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक
- सिल्लोड नगर परिषदेत समाज सेविकेसह अन्य लोकांचा राडा
- करुणा धनंजय मुंडे लढवणार आमदारकी,आज घेतली महापौरांच्या भेट
- संजय राऊतांच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करा : चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
