Share

रोमहर्षक सामन्यात विजय मिळवत भारताचा रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

रायपुर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर रोमहर्षक विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. आखेरच्या षटकांपर्यंत चाललेल्या या सामन्यात भारताने १२ धावांनी विजय मिळवला आहे. आखेरच्या षटकांत १७ धावांची गरज असताना वेस्ट इंडिजने फक्त ४ धावा करत एक गडी गमावला.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या उपांत्य सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सचिन तेंडुलकरच्या अर्धशतक आणि युवराजच्या फटकेबाजीच्या जोरावर ३ गडी गमावत २१८ धावसंख्या उभी केली. सचिन-सेहवाग या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. सेहवाग बाद झाल्यानंतर सचिनने मोहम्मद कैफ आणि युसूफ पठाणच्या साथीने धावफलक हलता ठेवला. सचिन बाद झाल्यानंतर आलेल्या युवराजने फटकेबाजी करत भारताची धावसंख्या २०० च्या पार नेली.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने पहिला गडी स्वस्तात गमावला मात्र त्यानंतर सलामीवीर स्मिथने जोरदार फलंदाजी करत भारतीय संघाच्या गोलदांजीचे पाणी पळवले. स्मिथ बाद झाल्यानंतर ब्रायन लाराने फटकेबाजी करत सामना वेस्ट इंडिजला विजयाच्या दारात आणले होते. मात्र एकोणीसाव्या षटकांत लारा बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजानी टिच्चुन गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या संघाला २०६ या धावसंख्येवर रोखले. आखेरच्या षटकामध्ये वेस्ट इंडिजला विजयासाठी १७ धावांची गरज असताना इरफान पठाणने फक्त चार धावा देत एक बळी मिळवला आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!