🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
झारग्राममधील रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडून कोरोना लस मिळत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘भाजपा सर्वात मोठी खोटारडी पार्टी आहे, जी देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी केंद्र सरकारला राज्यात कोरोना लस पाठविण्यास सांगितले, परंतु ही लस त्यांनी पाठविली नाही. कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. तरीही केंद्र सरकार आम्हाला लस देखील विनामूल्य देत नाही,’ असे सांगत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या कि, ‘आम्ही बऱ्याच दिवसांपासून सांगत आहोत, आपल्या सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिहारमधील जनतेला मोफत लसीबद्दल सांगितले होते. तेथील लोकांना ही लस मिळाली का?’ असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्यावर देखील ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला आहे. ‘मोदींनी आपल्या भाषणात रेशन योजनेचा पुनरुच्चार केला, त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदविला आहे. तसेच, भाजपाचे नेते हॉटेलमधून जेवण आणतात आणि दलित लोकांच्या घरात जेवणाची चर्चा करतात, हा गरिबांचा अपमान आहे,’ असा घणाघात ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींसह भाजपवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- रिलायन्सने फेटाळल निता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठाने व्हिजिटिंग प्रोफेसरचा दर्जा दिल्याच वृत्त
- आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण
- फडणवीस थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेणार; वाझे-हिरेन प्रकरणी नवा दावा करणार ?
- महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करणारी भाजपा कॉंग्रेसच्या आरोपांना उत्तर का देत नाही ?
- बीडच्या अधिकाऱ्यांवर सुनिल केंद्रेकर संतापले, म्हणाले ‘सुधरा रे,अन्यथा..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
