🕒 1 min read
अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशीच इंग्लंडचा डाव अवघ्या २०५ धावांवर गुंडाळला. दरम्यान, या कसोटी सामन्यात देखील भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये गरमा-गरमी सुरु असल्याचं दिसून आलं.
मैदानात बेन स्टोक्स आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एकमेकांना भिडले होते. हा वाद एवढा वाढला की अंपायर्सना मध्यस्थी करावी लागली होती. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना कर्नाटक विराट कोहली आणि बेन स्टोक्समध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळली. याची सुरुवात मोहम्मद सिराजच्या एका बाऊन्सर चेंडू पासून झाली होती. यानंतर, स्टोक्स आणि कोहली मैदानातच एकमेकाला भिडले. अखेर दोन्ही पंचांना मध्यस्थी करुन वाद आटोक्यात आणावा लागला.
शाब्दिक वादानंतर स्टोक्सने प्रतिक्रिया दिली आहे. स्टोक्स म्हणाला, “आजकाल क्रिकेट खेळत असलेल्या दोन संघांतील खेळाडूंमध्ये बाचाबाची होणे साधारण होणे. परंतु ही साधारण घटना फार लवकर चर्चेचा विषय ठरते आणि याला वेगवेगळे रंग चढवण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. परंतु कोणाला कमी लेखण्याची आमची अजिबात इच्छा नाही. प्रतिस्पर्धी संघांचे खेळाडू सहज बोलत जरी असतील, तरी असे वाटते की आम्ही काही चुकीचे केले आहे.”
महत्वाच्या बातम्या
- सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग अनुभवी जोडी मैदानात, पाहा तो व्हिडीओ
- जितनी चाहा उतनी मोहब्बत नही मिली, मुनाफेको छोडो लागद भी नही मिली; आमदाराची अधिवेशनात ‘दर्दी’ शायरी
- पंतच्या शतकानंतर ‘हा’ खेळाडू म्हणाला, ‘अरी दादा ! मजौ आगौ’
- महागाईचे चटके वाढले मात्र केंद्र सरकारच्या सर्वच पातळय़ांवर तसा ‘सन्नाटा’च’
- कांचनवाडी येथील पाण्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प; पहिल्या टप्प्यात २ एलएमडी पाण्यावर प्रकल्प
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
