Share

‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’

Published On: 

मुंबई : 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली.चौफेर टीका झाल्याने तसेच महाविकास आघाडीच्या अडचणी देखील वाढू लागल्याने रविवारी (२८ फेब्रुवारी )या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

गेल्या चार दिवसांपासून हा राजीनामा जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे असला तरी कोणतीही कारवाई न केल्याने काल भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर, आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या राजीनाम्यावर स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली होती. राज्यपाल कार्यालयाने संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केल्याची माहिती दिली आहे. यामुळे, आता पूजा चव्हाण प्रकरणी पुढील तपास कसा होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजीनामा हे पहिलं पाऊल असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल पूजाला न्याय मिळायला हवा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा मंजूर करायला ४ दिवस लावले, आता अटक करायला किती दिवस लावणार असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी राठोडचा राजीनामा मंजूर करायला चार दिवस लावले, आता अटक करायला किती दिवस लावणार?’ असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!