Share

बोंड अळी, ओखी वादळ नुकसानग्रस्तांसाठी केंद्राकडे 2425 कोटींची मागणी – चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई : राज्यात कापसावरील बोंड अळी, धानावरील तुडतुडे व ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. यातील नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे मदतीसाठी पत्र दिले असून त्याद्वारे 2 हजार 425 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. याबाबत श्री. पाटील म्हणाले, राज्यात कापसावर बोंडअळी तसेच धानावर तुडतुडे अळी त्याचप्रमाणे समुद्रातील ओखी वादळामुळेही किनारपट्टी भागातील पिक व फळ बागांचे नुकसान झाले होते. या सर्व घटनांचे पंचनामे करण्यात येत आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. ही मदत तातडीने मिळण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!