Share

लातूरच्या रेल्वे कोच कारखान्यात रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे – खा. सुधाकर श्रृंगारे

Published On: 

लातूर : जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यामध्ये 70 टक्के स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी खा. सुधाकर श्रृंगारे यांनी संसदेत केली. लातूर येथे रेल्वे कोच कारखान्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. या कारखान्यात पहिलावहिला कोच काही दिवसांपूर्वीच तयार झाला आहे. कारखान्यात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

अनेक वर्षांपासून पाण्याअभावी लातूरचे हाल झाले आहेत. दुष्काळाचे चटके सर्वाधिक या जिल्ह्याने सहन केले आहेत. पाणी नसल्याने कोणताही मोठा उद्योग जिल्ह्यात आला नव्हता. येथील तरुणांना मुंबई, पुणे अशा ठिकाणी रोजगारासाठी जावे लागते. परंतु कोच कारखान्यामुळे अनेकांना रोजगार मिळू शकतो, असे मतही त्यांनी मांडले.

लातूर जिल्हा केवळ औद्योगिक विकासाच्या बाबतीतच नव्हे तर आर्थिक विकासाच्या बाबतीतही मागे राहिलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. लातूरच्या रेल्वे कारखान्याला लागणारा कच्चा माल व त्यावर आधारित कामे, साहित्य व गरजेची माहिती लवकरात लवकर स्थानिक लोकांना उपलब्ध करून द्यावी. यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांची उभारणी होईल आणि स्थानिक पातळीवर कोच कारखान्याला आवश्यकतेनुसार पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे खासदार श्रुंगारे यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!